Posts

Showing posts from January, 2023

जागतिक नारळ दिवस

Image
जागतिक नारळ दिवस आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला नारळाची उपमा दिली म्हणजे तो व्यक्ती कसा असेल अर्थातच बाहेरून कठोर दिसणारा पण मनातून अगदी निर्मळ आणि मनाला भावून जाइल असा, नाही का. आणि हे जे नारळ आहे त्याचे कित्येक तरी फायदे आहेत. केवळ खाद्य आणि अखाद्य उपयोगांव्यतिरिक्त मानवी आयुष्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या या फळाचा आज दिवस आहे म्हणजेच आज जागतिक नारळ दिवस म्हणजेच world coconut day आहे. म्हणूनच जाणून घेऊ याच फळाबद्दल काही विशेष व मजेशीर बाबी. नारळाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक नारळ दिन २ सप्टेंबरला साजरा केला जातो. खाद्यपदार्थांपासून औषधांपर्यंत, पूजाविधीपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत आणि असे अगणित उपयोग आहेत या नारळाचे. कोकोनट हा नट नाही तो स्टोन फ्रूट आहे.नारळाचे तेल हे अन्य कुठल्या फळाच्या तेलापेक्षा सौंदर्यप्रसाधनांमध्ये सर्वात जास्त वापरले जाते. नारळ हा समुद्रात कितीही दूरपर्यंत व कितीही दीर्घ काळ तरंगत जाऊ शकतो.. त्यांनतरही त्याचा रुजण्याचा गुणधर्म टिकून असतो. नारळाला कोकोनट हे नाव अर्धे पोर्तुगीज नावाड्यांकडून तर अर्धे इंग्लंडमध्ये मिळाले आहे. १६ व्या श...

भारतीय वास्तुकला

Image
भारतीय सभ्यतेच्या सर्वात चिरस्थायी कामगिरींपैकी एक निःसंशयपणे त्याची वास्तुकला आहे. शतकानुशतके विकसित झालेली भारतीय वास्तुकला ही सामाजिक-आर्थिक आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम आहे. विविध प्रकारच्या भारतीय स्थापत्यशैलींमध्ये अंतराळ आणि काळातील अनेक अभिव्यक्तींचा समावेश होतो, जे भारतासाठी अद्वितीय मानल्या जाणार्‍या इतिहासाच्या शक्तींनी बदललेले असते. विपुल विविधतेच्या परिणामी, स्थापत्यशास्त्राच्या नमुन्यांची एक विस्तीर्ण श्रेणी विकसित झाली आहे, ज्याने संपूर्ण इतिहासात ठराविक प्रमाणात सातत्य राखले आहे. भारतीय वास्तुकला, इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडाशी संबंधित, संबंधित कालखंडाचा शिक्का धारण करते. जरी सिंधू खोऱ्यातील शहरे व्यापक शहर नियोजनाचे ठोस पुरावे देतात, तरीही भारतीय वास्तुकलेची सुरुवात भारतात बौद्ध धर्माच्या आगमनापासून केली जाऊ शकते. याच काळात मोठ्या प्रमाणात भव्य इमारती उभ्या राहिल्या. बौद्ध कला आणि स्थापत्यकलेची काही ठळक वैशिष्ट्ये म्हणजे सांची येथील ग्रेट स्तूप आणि अजिंठा येथील दगडी गुहा. दक्षिण भारतात हिंदू राज्ये स्थापन झाल्यावर दक्षिण भारतीय स्थापत्यशास्त्राची भरभराट होऊ लाग...

मासिक पाळी

Image
स्त्रियांचा आयुष्यातील अविभाज्य घटक म्हणजे मासिक पाळी पण भरपूर महिला ह्या अश्या आहेत की ज्यांना अनियमित मासिक पाळी चा त्रास होत असतो आणि त्या याकडे दुर्लक्ष करतात ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो सर्वात अधितर आपण बघुयात की अनियमित मासिक पाळी म्हणजे काय नॉर्मली मासिक पाळी मधील अंतर हे 28 ते 35 दिवसांचे असते पण काही महिलांच्या बाबतीत हे अंतर वाढते किंवा मग काम होते त्यांना 28 ते 35 दिवसांच्या आधीच किंवा नंतर मासीक पाळी सुरू होते. या कडे जर का वेळीच लक्ष नाही दिले तर pcod, pcos असे आजार उद्भवू शकतात. अनियमित मासिक पाळी नियमित व्हावी या साठी काही उपाय आहेत जे केले तर नक्कीच फायदा होईल. आधी तर आपण पाहुयात की मासिक पाळी अनियमित होण्यामागची कारणं काय आहेत. जास्त तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. या व्यतिरिक्त म्हातारपणाचा किंवा तरुणपणाचा परिणामही मासिक पाळीवर दिसून येतो. ज्या स्त्रियांचं वय 40 पेक्षा जास्त आहे त्यांना मोनोपॉज पूर्वी मासिक पाळीमध्ये अनियमितता असू शकते. या व्यतिरिक् तरुण स्त्रियांमध्ये संप्रेरक बदलांमुळे देखील मासिक पाळीत अनियमितता येती. ...